Friday, January 20, 2012

kavita

सांगायचं बराच काही , मांडता येत नाही
चाक फिरवूनही आता , मनातला आकार , साकार होत नाही !

शब्द होऊन गेलेत खूप परके न भावनाही अनोळखी
घ्यावा लागतोय स्वताच्याच विचारांचा शोध ,
वाढवून आणिक विचारांची काळोखी !

मलभात दाटलेलं आहे भोवती , हवी ती किरणं कुठे हरवली ?
लक्ख सुर्याप्रकाशाताही , काळोखी आहे दाटली !

गहाळ झालीय प्रतिभा इतकी , कि शोधतोय "कोलावारी"तला गर्भित अर्थ
अडकल्या गुंत्याला सोडवू पाहणारे , मात्र अजूनही उरलेत मित्र !

जान्हवी

No comments: