Friday, January 20, 2012

विराणी

जगण्याने वार केले, कैफियत कुणा सांगावी ?
तुटले काही अंतरात , व्यथा कशी मांडावी ?

विझत गेले क्षण-क्षणांनी , ज्योत पुन्हा कशी फुलवावी
निर्माल्य झाली सुमने , गंधित आता कशाते व्हावी ?

चांगलेच होते सारे , चांगलाच तू ही , चांगलीच मी ही
परी अति झाले नि उतू गेले कि ,
चांगलेपनाची हार झाली

हुंदके दाटून आले , परी नेत्र मी कोरडेच ठेले
अश्रुंनो परतुनी जा , वाहण्याचीही आता चोरी झाली

भावनांचा बाजार मांडला ,मोल कमी-जास्त ठरवोनी घ्या
ओलेती ही लेक माझी , आज पाठवणी झाली

म्हणत होते लिहून जावी , काही प्रीत गाणी
हाय ! पार हातून माझ्या , पुन्हा ही विराणीच झाली !

जान्हवी

No comments: