Tuesday, June 21, 2011

कविता


भावनांचे मेघ दाटती
कल्लोळ होतो शब्दांचा
कागदावरी अन् उतरत जातो
पाउस वेड्या कवितेचा

असह्य होवुनि अंधार दाटतो
वादळ वारा विचारांचा
कागदावरी...

विजकल्पना त्यातून स्मरते
वेध घेत त्या तिमीराचा
कागदावरी...

तंद्री लागते कसलीशी अन्
नाद ताल त्या धूंदिचा
कागदावरी...

झरझर झरझर हात चालतो
श्वास बनोनि शाइचा
कागदावरी...

प्रतिबिंब त्यातच उमटत जाते
तो आरसा होत मनाचा..
कागदावरी...

जान्हवी

No comments: